गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

निळावंती ग्रंथ (भाग ७)

निळावंती ग्रंथ (भाग ७)

निळावंती ग्रंथाबद्धल आणखी माहिती :-

     निळावंती ग्रंथ हा अघोरी विद्या संबद्धित असल्याने त्या ग्रंथावर स्वतंत्र्यपूर्व काळात म्हणजेच १९३२-३५ च्या दरम्यान भारत सरकारने हा ग्रंथ छापण्यावर बंधि घातली आहे .
     आता हे ग्रंथ फक्त गुरु पासून ते शिष्याकडे चालत असलेली तोंडी ज्ञान आहे . ज्यामुळे असे अनेक मंत्र सांगितल्या गेलेत की , अन्न खराब होऊ नये , गुप्त धन कसे शोधावे . कोणाच्या मनातील कसे समजावे , वस्तू कोणी चोरली कसे समजावे ई. असे मंत्र हे परंपरेने चालत आलेले आहे . उदा :- काही वर्षा अगोदर दरवाजावर येणारा पिंगळा यांना मानसशास्त्राचा ज्ञानी असे सुद्धा म्हटल्या जात असे, त्यांना अनेक पशू - पक्षांच्या आवाजाचे सुद्धा ज्ञान असल्याचे सांगितल्या जाते , हा म्हणजे हा पिंगळा निराशतेने भरलेल्या माणसांच्या मनात आशावाद निर्माण करणारा असतो.
     निळावंती ग्रंथ कोणाला मिळाला तरीही तो त्या व्यक्तीला वाचताच येईल असे नाही . कारण निळावंती या ग्रंथाची लिपी ही आज समजणार असे वाटत नाही, कारण निळावंती ग्रंथ हा हजारो वर्षां पासून चालत आलेल्या अघोरी विद्येच्या ज्ञानाचा  साठा आहे . त्याची लिपी ही संस्कृत भाषेत व मोडी लिपीत लिहिलेले श्लोक आहेत, परंतु आज इंग्रजी व इतर भाषांच्या तुलनेत मोडी लिपी व संस्कृत लिपी हरवलेली आहे. 

निळावंती ग्रंथ कसा वाचावा :-

     निळावंती ग्रंथा विषयी अनेक श्रद्धा व अंधश्रद्धा आहेत , व आज हा ग्रंथ उपलब्द असणारच असे नाही , पुस्तक संग्रहालय मध्ये किंवा पुस्तकांच्या दुकानात किंवा नेट वर या पुस्तकांची मार्केटिंग केली जाते . ते असलेले निळावंती ग्रंथ मुळ ग्रंथ नसून फक्त कथा स्वरूपात आहे .

     अनेक ठिकाणावरून माहिती गोळा करून असे समजले की , गरोदर बाई चा मृत्यू झाल्यावर तिच्या प्रेताची विल्हेवाट लावताना तिला जो अग्नी दिला जातो त्याच अग्नीच्या प्रकाशात हा ग्रंथ वाचून पूर्ण करावा . तेव्हा या ग्रंथातील ज्ञान त्या व्यक्तीला प्राप्त होते जगात असलेले सर्वच प्राण्यांची भाषा , मंत्र सर्वच या ग्रंथातून प्राप्त होते .
     तसेच या ग्रंथामध्ये वेगवेगळे अंजन तयार करण्याची विधी पण सांगितली आहे . जसे की , जमिनीखाली गुप्त धन लपविलेले असेल त्याविषयी अंजन तयार करून डोळ्यांमध्ये लाविले तर निश्चित असलेल्या ठिकाणी गुप्त धन पाहू शकतो . जर चोरांचा शोध लावायचा असेल त्यांची पण विधी सांगितली आहे . ज्यामुळे चोरांचा चेहरा पाण्यामध्ये पाहता येऊ शकतो.

     वरील प्रमाणे निळावंती व निळावंती ग्रंथ या विषयी माहिती सांगितली आहे ही सर्व माहिती अनेक ठिकाणावरून गोळा करून प्रसिद्ध केल्या गेलेली आहे .मी स्वतःहा सुद्धा हा ग्रंथ शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु प्रत्येक ठिकाणावरून निराशाच पदरात पडलेली आहे . 

     हा संपूर्ण लेख कथेच्याच स्वरूपात मानावा व वाचावा या लेखातील माहिती सुद्धा परंपरेने चालत आलेल्या कथेवर आधारित आहे . मी या कथेला परिपूर्ण सत्य आहे असे मानीत नाही .

निळावंती (भाग ६)

निळावंती ग्रंथ (भाग ६)
निळावंती ग्रंथाबद्दल आणखी महत्त्वाचे :-

१) निळावंतीला अनेक प्राण्यांच्या आवाजाचे ज्ञान होते व या ग्रंथात त्या आवाजाचे विश्लेषण केलेले आहे , मुंगीचा आवाज सिखण्यापासून तर तंत्र - मंत्र , अनेक गूढ विद्या विषयी या ग्रंथात माहिती सांगितली आहे .

२) आध्यात्म विषयी लिखाण व प्रचार प्रसार करणारे हैंबतीबाबा पुसेसावळीकर यांनी ही निळावंती ग्रांथाविषयी अनेक स्लोक लिहिलेले आहेत असे आढळते .

३) १६०५ ते १६२५ च्या दरम्यान दुसरे भास्कराचार्य यांचा एक लिलावती ग्रंथ प्रसिद्ध झालेला होता. दुतीय भास्कराचार्य यांनी लिहिलेला लिलावती ग्रंथ व मुळात असलेला निळावती ग्रंथ या दोन्ही ग्रंथामध्ये खूप फरक आहे . अर्थात ही दोन्हीही ग्रंथ वास्तवात वेगळे आहेत कारण मुळ निळावंती ग्रंथ आपण पाहिलेल्या अघोरी विद्या , गुप्त धन , पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सर्वच प्राणीमात्रांची भाषा , काळी जादू या सर्वांच्या संबधित आहे तर 

     भास्कराचार्य यांनी लिहिलेला लिलावती ग्रंथ हा कोणत्याही कालीजादु , अघोरी विद्या , पशुपक्षी यांची भाषा अवगत करण्याची कला श्लोक या विषयी नाही. भास्कराचार्य यांनी लिलावती लिहिण्यामागचे असे कारण सांगता येईल की , भास्कराचार्य यांना लिलावती नावाची एक मुलगी होती . तिच्या नावावरून दुत्तीय भास्कराचार्य यांनी गणित शास्त्र विषयी लिलावती हा अठरा ते वीस पांनाचा ग्रंथ लिहून पूर्ण केला होता . या लिलावती ग्रंथामध्ये सुद्धा अनेक श्लोक सांगितले आहेत परंतु ते श्लोक गणित शास्त्र विषयी आहेत . तर दुसरी कडे असे सांगितले जाते की लिलावती ही भास्कराचार्य यांची मुलगी नसून त्यांची पत्नी आहे . 

४) दुर्गा भागवत :- यांची लिखाणात अतुलनीय कामगिरी असून त्यांना संशोधनावर लिखाण करण्यात आवड होती व त्यांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत . दुर्गा भागवत यांनी सुद्धा निळावंती या ग्रंथाची मूळ प्रत शोधण्याचा प्रयत्न केला . असा त्यांनी प्रासंगिका या ग्रंथात उल्लेख सुद्धा केलेला असल्याचे दिसून येते व त्यांनी त्यांच्या लेखनिद्वारे स्पष्ट केले की , स्वामी विवेकानंद यांनी तो ग्रंथ वाचून पूर्ण केलेला आहे , म्हणून त्यांचा मृत्यू ची वेळ येण्या अगोदरच निळावंती ग्रंथ वाचून पूर्ण झाल्यावर सहा महिन्याच्या आत स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू झाला ..

निळावंती ग्रंथ (भाग ५)

निळावंती ग्रंथ (भाग ५)

निळावंती च्या वैवाहिक जीवनाला सुरुवात :- 

     निळावंती आपला प्रवास करीत गावामध्ये पोहोचते व तिच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात होते . निळावंती दर रात्री आपल्या शयन कक्षातून बाहेर जाते . अटी प्रमाणे तिचा पती तिच्या मागे जाऊ शकत नाही व निळावंती तेव्हाच घराच्या बाहेर पडायची की तिची संपूर्ण खात्री होईल की तिचे परिवार वाले झोपले असतील .
     एके रात्री निळावंती घरचे सर्व झोपले असल्याची खात्री करून घेते ती नेहमी प्रमाणे मध्यरात्री आपल्या शयन कक्षातून बाहेर पडते तेवढ्यात तिला एका कोल्याची कोल्हेकुई ऐकू येते , निळावंती ला सर्व प्राणी मात्रांचे आवाजाचे ज्ञान असल्याने निळावंती सर्व समजून जाते . ती आणखी समोर गेल्यावर तिच्यासोबत घुबड बोलते व तिला सांगते की , तुला तुझ्या लोकांत जाण्याची वेळ आलेली आहे . या ठिकाणी आपल्यांना समजते की, निळावंती ही आयुष्यभर इथे राहण्यासाठी आलेली नव्हती व ही एक देव लोकातील स्त्री असणार जी पृथ्वी वर कुठेतरी वाट चुकलेली आहे , तिची आता तिच्या लोकांमध्ये जाण्याची वेळ आलेली आहे त्यासाठी तिला गावाशेजारील दिव्य नदी पार करावी लागणार त्यासाठी तेथे एक नाविक असणार आहे जो तिला ती दिव्य नदी पार करण्यासाठी मदत करील त्यासाठी त्या नविकाला त्यांच्या करारानुसार काही तरी देणे गरजेचे असते आणि ती वस्तू नाविकाला देण्यासाठी आज रात्री तिला मिळणार आहे व ती आपल्या लोकांत जाऊ शकेल .
     नदीचा उगम ज्या ठिकाणावरून होत असतो तिथे युद्ध सुरू राहते , त्या युद्धातील एक सैनिक चा मृतदेह त्या नदीतून वाहत जात असतो , त्या मृतदेहाच्या कमरीला एक ताईत बांधलेले असते त्या ताईत चा आपला एक इतिहास असतो, परंतु या ठिकाणी तो ताईत त्या नदीवरील नाविकाला दिल्यास तो नाविक निळावंती ला नदी पार करून देणार होता व निळावंती आपल्या लोकांत जाऊ शकणार होती, तेवढ्यात तो मृतदेह नदीमधून वाहत येत असतो , निळावंती त्या मृतदेहाला पकडण्यासाठी नदीमध्ये उडी मारून त्या मृतदेहाला पकडते व त्याच्या कमरीचे ताईत काढण्याचा प्रयत्न करते परंतु त्या ताईत ची गाठ पाण्यामुळे आणखी फिट झाल्यामुळे तिला ती गाठ सोडणे कठीण होऊन जाते , म्हणून निळावंती ती गाठ आपल्या दातांनी सोडण्याचा प्रयत्न करते , आता या ठिकाणी तिचा पती येवढ्या रात्री तिचा पाठलाग करीत होता व तो नदीच्या किनाऱ्यावरून तिला पाहत होता , निळावंती ताईत ला आपल्या दातांच्या साहाय्याने सोडविण्याचा प्रयत्न करीत होती,  पण तिच्या नवऱ्याला व त्यांच्या साथीदारांना वाटत होते की ही मृतदेह आपल्या दातांनी कुरतडून खात आहे , त्यामुळे किनाऱ्यावरील सर्वच लोक तिच्याकडे किळसपणे पाहत होते निळावंती जेव्हा ताईत घेऊन किनाऱ्यावर येते , तेव्हा कोणीही विचार पण केलेला नसणार अशी घटना घडते . निळावंतीचा जो नवरा आहे तो तिचा पाठलाग करीत असतो , तो एका राक्षसाचे रुप धारण करतो व निळावंतीवर जादूचा प्रयोग करून तिचे जवळील ताईत घेऊन जंगलाच्या दिशेने पळत सुटतो हे सर्व अचानक पने घडल्यामुळे निळावंतीला धक्का पोहचतो व निळावंती आपले रूप बदलून ती पण जंगलाच्या दिशेने पळत सुटते , आता या ठिकाणी निळावंतीने जे ज्ञान हजारो प्राणी मात्रांकडून मिळविले होते व तिच्या जवळील सर्वच ज्ञान जे निळावंतीने ताम्रपटावर लिहून ठेवले होते , ते सर्व निळावंती त्याच ठिकाणी सोडून देते , सोबत असलेल्या गावातील लोकांनी ती सर्व ताम्रपट गोळा करून तो ग्रंथ स्वरूपात तयार केला व आज तो निळावंती ग्रंथ म्हणून प्रसिद्ध आहे .

     अशी निळावंती व तिच्या ग्रंथाबद्दल एक बाजू सांगितली जाते , दुसरी बाजू अशी की, त्या पवित्र नदिमधून वाहत येणाऱ्या प्रेत ला पकडून निळावंती त्या प्रेतच्या कमरेला बांधलेल्या ताईत ला सोडविण्याचा प्रयत्न करते परंतु ती गाठ घट्ट असल्याने हाताने सोडणे कठीण होऊन जाते , म्हणून ती आपल्या दातांच्या साहाय्याने गाठ सोडविण्याचा प्रयत्न करते , परंतु तेवढ्यात निळावंती चा नवरा त्या ठिकाणी येतो व त्याला वाटते निळावंती दाताने प्रेताला कुरतडून खात आहे , असे तिचा नवरा  व त्यांच्या सोबत आलेले गावकरी असे दृश्य जेव्हा पाहतात तेव्हा तिचा नवरा तिला सोडून जातो व निळावंती ही एकटी होते अशी आणखी एक कथा निळावंती व तिच्या ग्रांथाबद्दल सांगितली जाते .

भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती

आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर...