भारतीय राष्ट्रीय आंदोलन (भाग २)
भारतीय स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी
राष्ट्रीय आंदोलन भाग २
भारतीय स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी :-
भारतीय स्वातंत्र्य प्रत्येक काळात कोणत्या ना कोणत्या कारणाने एखाद्या राजाच्या किंवा राज्यकर्तेच्या अधिपत्याखाली पारतंत्र्यात होते . परंतु ते राज्यकर्ते भारतातील संस्कृतीला स्वीकारून भारतीयांसोबत रोटीबेटीचे व्यवहार करीत होते. त्यामुळे भारतात येणारे राज्यकर्ते भारतामध्ये येऊन भारतामध्ये वास्तव करीत होते, व भारताची राष्ट्रीय संपत्ती भारतामध्ये च राहत होती. परंतु अपवाद इंग्रज वगळता .
ब्रिटिशांनी ३१ डिसेंबर १६०० मध्ये भारतात कंपनी ची स्थापना करून व्यापार करीत होते, परंतु ब्रिटिश हे महत्त्वाकांक्षी असल्यामुळे ते भारतावर राज्य करण्याचे स्वप्न पाहत होते , परंतु ब्रिटिश कधीही भारतीयांचे होऊ शकले नाहीत. ब्रिटिशांना व्यापरामधून मिळणारा अमाप नफा ते त्यांच्या देशामध्ये पाठवीत होते.
ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाविषयी चा अहवाल भारतीय विचारवंत , शिक्षण तज्ज्ञ दादाभाई नौरोजी यांनी स्पष्ट केला. त्यांनी लिहिलेल्या पोवर्टी अँड अन् ब्रिटिश रुल इन इंडिया या पुस्तकामध्ये भारतीय संपत्ती कशी ब्रिटिश राज्याकडे वाहत आहे या पुस्तकामध्ये स्पष्ट केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा