रविवार, १८ जुलै, २०२१

मी अधिकारी कसा होणार भाग ५

मी अधिकारी कसा होणार भाग ५
     गणू आता तालुक्याला जाण्याचा विचार करतो, कारण त्याचा अभ्यास बऱ्याच दिवसापासून मागे राहिलेला होता,  आता तालुक्याला जाण्याचा दिवस येतो, गणू जाण्याची तयारी करतो, तेवढ्यात त्याचे बाबा घरी येतात , गणू त्याच्या बाबांना काही पैसे मागतो , त्याचे वडील तसेच चिडलेले असतात, की बरेच वर्षांपासून पोरगा शिक्षण घेत आहे पण अजून पण कोठे जमलेले नाही. व लोकांनी सांगितलेले शिक्षणा विषयी नकारात्मक भावना , या कारणाने गणीचे वडील पण चिडलेले असतात , गणू जेव्हा पैसे विषयी विचारतो की मला जायचे आहे काही रुपये पाहिजे होते, त्याचे बाबा गनुवर रागाने भडकतात कोणते शिक्षण होय तर , 5,6 वर्ष झाले अजुन शिक्षणच चालू आहे काहीजण कधी लागेल, गनुचे वडील असे बोलतच गणू चे मन तुटून जाते, या छोट्याश्या शब्दाचा गनुवर खूप मोठा परिणाम होतो, स्वतःवर असलेला त्याचा विश्वास आता डळ मळीत होत होता, तो पण रागाने म्हणतो जाऊ द्या मी पण शिक्षण घेत नाही, मला पण शिकायचं नाही, सर्वच सोडून देतो , वावरत जात जाईल बस
     
      येवढे बोलून गणू रागा रागात घराच्या बाहेर निघतो, थोड्या वेळाने गनुच्या घरी त्याच्या आई वडिलांच्या त वाद पेटतो की तुम्ही गणुला असे का म्हटले, गानुचे. वडील गानुच्या आई ला समजाऊन सांगतात की घरची परिस्थिती कोणत्या दिशेने जात आहे , घरी पैसे काहीच नाही , पेरण्याचे दिवस आहेत , जवळ असलेल्या पैसेचे बियान आणले , गावातील लोकांचे कर्ज आहे ते वेगळे, माझ टेन्शन मी कोणाला सांगू, हे सर्व गणू बाहेरून ऐकत असतो , गणुला आपली परिस्थिती पाहून अभ्यास करण्याची आणखीनच हिम्मत मिळते , गणुचे वडील तेव्हाच घरातील एक पोते घेऊन गावात फेर फटका मारायला जातात , व विकत घेतलेले बियाणे पुन्हा विकतात व गणुला शिक्षणासाठी पैसे देतात, गणुला गणुला खूप वाईट वाटते की आपण आपल्या आई वडिलांना कोणत्या भाषेत उत्तर दिले म्हणून, गणू मान खाली घालून तालुक्याला निघतो , जातांना त्याची आई त्याला म्हणते , बाबू घरचे टेन्शन नको घेऊ.  तू फक्त अभ्यासावर लक्ष दे , कधी पण पैसे पाहिजे असतील तर मांग, घर , वावर , सर्व तुझ्यासाठीच आहे . तू आमचे टेन्शन नको घेऊ , तू फक्त अभ्यासावर लक्ष दे , गणू थोड्या वेळाने तालुक्याला निघून जातो , त्याचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी ..........




मी अधिकारी कसा होणार भाग ४

मी अधिकारी कसा होणार भाग ४
     बरेच दिवस झाले होते गणू गावाकडे गेला नव्हता, गणुला पण घरची आठवण येत होती, गणू काही दिवसांसाठी घरी जाण्याचे ठरवितो, कारण त्याला निघालेल्या जागेसाठी खूप काही अभ्यास करायचा असतो, व बरेच दिवस त्याचे गावाकडे येणे होणार नाही , म्हणून काही दिवसांसाठी गणू गावाकडे येण्याचे नीच्छित ठरवितो, गणूचा 5,6 दिवसांचा मुक्काम ठरलेला म्हणायचा, म्हणून घरी येण्याच्या अगोदर गणू सर्व मित्रांची भेट घेतो, व गावाकडे निघतो, गनुचा चांगला अभ्यास होत असल्याने गणू मनात ठरवितो की आता जी post येणार ती exam देऊन  लवकरात लवकर नोकरीला लागायचे व समोरील exam सुद्धा देऊन वरील post काढायची तो त्याच्या मनातच बरेच काही विचार करून ठेवतो. गणू गावाकडे येतो , भेटणारे अनेक लोक त्याच्या कडे येतात , कारे गणू काय चालू आहे मग, काय करतो तू तालुक्याला , कारे किती दिवसाचा लागलाच नाही काय, माय बापला किती फसवितो  , अनेक नकारात्मक लोक गणु ला भेटत होते पण गणुवर त्यांचा प्रभाव काहीच पडत नव्हता , कारण त्याचा विश्वास त्यांच्या आई बाबांवर अधिक होता त्यांच्या मेहनतीवर अधिक होता, गणु ला जेव्हा त्याच्या शाळेतील काही मुलं भेटत होते, ते पण पुणा राहणारा , कारे गणू काय करतो लेका काम गिम कर, मला तर काम करावेच लागते , तुझ चांगलं आहे बा , तुझे माय बाप तुला पोचतात, आमचे माय बाप आम्हाला नाही पोचत, आम्हाला काम करावेच लागते , आणखीन काही मित्र भेटल्यावर , म्हणजे जुने शाळेतील मित्र जे 10 पर्यंत सोबत शाळेत जाणारे होते, कारे गणू,, काय काम करतो मी काही तरी करायला पाहिजे लेका, मी जास्त नाही शिकलो पण मी माझ्या बहीण भावाला खूप शिकवले, तूले काही शिक्षणाच्या बर्यात माहिती पाहिजे त मले विचार मी अशीच चांगले च सांगतो मित्रांना , असे चांगले कोणी सांगत नाही आजकाल ( आता बघा गणू गणू च M A पूर्ण शिक्षण झाले पण हा 10 वी शिकलेला मुलगा गणू ला सांगतो की मी शिक्षण विषयी तुला माहिती सांगतो , कारण एकच की गणू अभ्यास करीत होता पण पैसे कमवित नव्हता, ) तू असे करण रे गणू तू MPSC ले asmission घे ते शाळा तालुक्याला पाय असेल तर ( गणू स्वतः हा MPSC करीत आहे , पण त्याच्या मित्राला हे पण माहित नाही की MPSC काय असते तर ) तो गेल्यानंतर गावातला मित्र भेटतो , काय गणू काय चालू आहे ताल तालुक्याला तू नोकरी वर लागला म्हणते , मी काय म्हणतो मले 30रुपये देणं मी तुले उद्याच वापस करतो, थोडी घेतो म्हटले 30 रुपये ची भेटते, कधी त मागीत नाही तुले , कधी त कामात पड, कधी तर माहीत नाही तुले,  असे अनेक प्रकारचे लोक गणुला भेटत होते व अनेक वेगवेगळे सल्ले गणुला देत होते, गणू प्रतिउत्तर तर काही देत नव्हता पण सगळ्यांना एक लहानशी हशी देत होता व तेथून निघून जात होता, 






शुक्रवार, १६ जुलै, २०२१

मी अधिकारी कसा होणार भाग ३

मी अधिकारी कसा होणार भाग ३
     गणू काही दिवसांनी गावाकडे गेला , पण गावात तो कोणाशीच जास्त बोलत नसे , घरी पण बोलताना चीड चीड करीत असे , गणू च्या वागण्यात होत असलेला बदल त्याच्या वडिलांच्या नजरेतून तो चुकाऊ शकला नाही. गणूच्या वडिलांनी गणु ला धीर देत म्हटले की , बाबू तुझा अभ्यास कसा सुरू आहे , तुझा अभ्यास तर होतो ना , गणू ने त्यांच्या वडिलांकडे निराशतेने पाहिले , त्यांचे वडील समजून गेले परंतु गणू जो पर्यंत बोलणार नाही तो पर्यंत त्याचे वडील काहीच करू शकत नव्हते , बऱ्याच वेळानंतर गणू उत्तरला , " बाबा जेव्हा पासून नोकरी करीत आहे तेव्हा पासून अभ्यास फक्त नावाचाच सुरू आहे " गणू ने सर्व सांगितले , गणू जेव्हा सांगीत होता जवळ त्याची आई पण बसलेली होती , गणुची आई गणु ला धीर देत म्हणाली , " बाबू एका दिवसात कोणीही मोठा माणूस होत नाही पण एक दिवस माणूस हा मोठा माणूस जरुर होतो " आई चे बोलणे ऐकून गणू थोडा सुखावतो , गणू चे वडील " बाबू तुला महिन्याचा खर्च किती येतो ते मला सांग "  गणूची आई " आपले मूल आपल्याला ओझे थोडी होणार आहेत , आपण गणु ला खूप शिकऊ " गणू आपल्या महिन्याचा खर्च सांगतो . व गणू काही पैसे घेऊन पुन्हा तालुक्याला येतो. गणू पुन्हा नव्याने अभ्यासाला सुरुवात करतो व खूप मन लाऊन अभ्यास करतो, नोकरी करीत असताना त्याने जमविलेले मित्र आता गणुचा वेळ खात होती , त्याच्या मित्रांचे अभ्यासाशी कोणतेही नाते नव्हते , ते दिवसातून कधीही येत असतं व गणुच्या खोली वर थांबत असत , गणुचे ते चांगले मित्र असल्याने गणू पण त्यांचे मन दुखावेल असा वागला नाही पण , परंतू तो किती दिवस स्वतःला समजावेल गणू त्यांना दुर्लक्षित करीत होता , त्यांचा फोन उचलणे कमी केला , ते खोली वर येत आहेत असे माहीत झाले तर तो खोलीच्या बाहेर जात होता , त्यांना कधी कधी टोचून बोलत असे , असे गणूचे खूप दिवस चालले , गाणूने पुन्हा आपल्या अभ्यासावर विजय मिळविला त्याचा अभ्यास पहील्यानपेक्षा ही अधिक चांग ला झाला , त्याला आणि त्याच्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना अशी पूर्णपणे खात्री होती की आता गणू पोस्ट तर नक्की काढणार.

      बरेच दिवस झाले गणू गावाकडे गेलेला नव्हता , त्याला गावाकडची आठवण पण येत होती, आणि तेवढ्यातच एक आठवण म्हणून त्याच्या आई चा फोन आला , बरेच बोलणे झाल्यावर त्याच्या आईने त्याला काही दिवसांसाठी घरी बोलाविले भेटण्यासाठी गणू ला पण घरच्यांची भेट घ्यायची होती , बरेच दिवस झाले होते . To ... Be... Countinue...




मी अधिकारी कसा होणार भाग २

मी अधिकारी कसा होणार भाग २
      गणू  दुसऱ्या दिवशी खोलीवर गेला , २,३ दिवस अभ्यास झालाच नाही , कारण त्याचे मन मनाला खात होते की आता काय करावे पैशांची अडचण आणि पाहिलेले स्वप्न , स्वप्नांना जेव्हा पैशांची सोबत असते असेच स्वप्न साकार होतात, गणुने खूप विचार करून कोणता तरी निर्णय घेतला व दुसऱ्या दिवशी शिकवणीला न जाता पार्ट टाइम नोकरी शोधायला गेला , तालुक्याच्या ठिकाणी पार्ट टाईम नोकरी कशी मिळणार हे त्याला कळून चुकले , त्याने मग पूर्ण दिवसाचा नोकरी करायची ठरवली , दिवसाला बारा तास काम करायचं आणि घरी येऊन स्वयंपाक करायचा व वाचलेला वेळेत अभ्यास करायचा  , काहीच दिवसात त्याला काम करून शिकणारे खूप मित्र जमविले व ज्यादा तर ज्यांनी काम करून अभ्यास केला त्यांनी अभ्यास सोडून देऊन फक्त कामच केले , आता तर गणु ला पण असेच वाटत होते की माझे पण भविष्य असेच तर नाही राहणार कारण बारा तास नोकरीचे कसे चौदा तास होत असतं कधीं कळायला वेळच मिळत नसे नंतर घरी जाऊन दोन तास स्वयंपाक आणि जेवण या मध्ये मिळत असतं जेथे १० ते १२ तास अभ्यास होत होता तेथे एक तास पण अभ्यास केला तर झोप येत होती , वेळ वाचविण्यासाठी जेवायचा डबा लावण्याचा विचार मनात आला  परंतु जेवणाचा डबा लावणे म्हणजे कामाचे पैसे डबा वाल्यांना देणे व पैशांची आता तर खूप गरज आहे , दोन महिन्यांनी गणू गावाला गेला आई वडिलांना सांगितले की मी तालुक्याला नोकरी करतो खोली भाडे निघून जाते व दोन पैसे पण शिल्लक उरतात घरच्यांना पण खूप आनंद झाला , घरच्यांचे पण एक टेन्शन दूर झाले ते म्हणजे पैशांचे कारण प्रत्येक फेरीला गणू पैशांचेच विचारायचा पण आता गणू नोकरी करतो म्हणजे पैसे मागणार नाही पण त्या वेळी गणू व त्यांच्या आई वडिलांना हे कळत नव्हते की पोराचा अभ्यास होत नाही तो कुठ तरी मागे जात आहे . असेच बरेच दिवस निघून गेले . गनुला स्पर्धा परीक्षेची तयारी करून ३ वर्ष उलटून गेली होती व घरचे पण याच आशेवर होते की गानुला सरकारी नोकरी लागणार , एक वेळी गणू UPSC च्या गोष्टी करणारा गणू ला आज साधी चपराशी च्या नोकरी वर पण विश्वास राहिला नव्हता कारण तालुक्याला असून सुद्धा त्याला त्याची नोकरी व घरी येऊन करीत असलेला स्वयंपाक या पलीकडे काहीच दिसत नव्हते . गणू आत मधूनच तुटत असे  पण सांगणार तर कोणाला त्याने स्वतःच तयार केलेले मनोराज्य ते म्हणजे नकार तेचे नकारात्मक विचारांचे , हेच नकारात्मक विचार त्याला रोज संपवित असे .





बुधवार, १४ जुलै, २०२१

मी अधिकारी कसा होणार भाग १

मी अधिकारी कसा होणार (भाग १)
ही लघु कथा भारतातील सर्व सामान्य घरण्यातीलच आहे ,ज्यांना वाटते की मला खूप मोठा अधिकारी व्हायचं आहे पण वाट्याला येणार मानसिक ताण यामधून त्याला सावरणे अवघड होऊन जाते व जगाच्या स्पर्धेत त्याला मागेच राहावे लागते . अशातीलच ही एक कथा आहे .

     हे वर्ष पदवीचे शेवटचे वर्ष होते , प्रत्येकाने आपल्या जीवनाचे वळण कोणत्या दिशेने ओढायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न बनलेला होता , कोणाला अधिकारी तर कोणाला डॉक्टर , वकील , मास्तर , बिझनेस मन तर कोणी पुना म्हणजेच शेवटचा पर्याय शिकलेल्या मुलांचा कंपनी गाठायची , असा प्रतेकाने आपले ध्येय ठरविले होते , व कोणी असे पण होते ज्यांना आपले ध्येय ठरविता आले नाही , 

     यावर्षीची पदवीची परीक्षा संपली पदवीचा निकाल जाहीर झाला व सर्वच आपल्या आपल्या ध्येय गाठण्यात व्यस्त झाले . या विद्यार्थ्यानं मधीलच गणू नावाचा विद्यार्थी त्याने पण जीवनात काही तरी करायचे ठरविले , पदवीची परीक्षा पास होताच त्याने तालुका गाठून MPSC ची परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे ठरविले , पण घरची परिस्थिती हालाखीची असल्याने त्याला तालुक्याला भाड्याने खोली करून राहणे जमत नव्हते ,त्याने बस महामंडळ ची पास काढून रोज शिकवनीच्या class का जात असे त्याचा अभ्यास बऱ्यापैकी चांगला चालला होता रोज सकाळी घरचा जेवणाचा डबा घेऊन जायचे व रात्री 8,9 च्या दरम्यान घरी परत यायचे परंतु घरची आर्थिक परिस्तिती हलाकीची असल्याने त्याला काम करणे गरजेचे झाले होते . 

     घरी पैसे मागित होता पैसे मिळत होते पण त्याला घराची परिस्थिती पण दिसत होती, एक परीक्षेचा फार्म भरतो म्हटले तर हजार रुपये ते बाराशे रुपये जात असतं कधी कधी तर अशी पण वेळ यायची फार्म भरेल असला तरी पण परीक्षेला जाण्याची इच्या नसायची कारण एक परीक्षे मागे त्याला आई वडिलांचे स्वप्न दिसत होते ,परीक्षेला जात आहे म्हटल्यावर त्याला आई वडिलांचा चेहरा दिसायचा , परीक्षा देऊन आले तर आई बाबांची प्रश्नांची शराबत्ती असायची की आता निकाल कधी समजतो या पेपर मध्ये लागशिल ना , पास तर होशील ना आता बाबाच्या ने काम होत नाही , असे अनेक नानाविध प्रश्न त्याच्या समोर यायचे म्हणून घराच्यासमोर परीक्षेला जाणे म्हणजे खूप मोठा जुलूम होत होता आणि प्रत्येक वेळी पैसे मागणे त्याला आता कमी पणाचे वाटत होते. म्हणून त्याने आता निर्णय घेतला की आपण तालुक्याला खोली भाळ्याने करून राहायचे खूप अभ्यास करायचा पार्ट टाइम जॉब करायचा त्यामधून खोली भाळे द्यायचे व जेवण खोलीवर च बनवायचे , व शिल्लक राहिलेल्या वेळेत शिकवणी आणि खूप अभ्यास करायचा तसे ठरऊन , गणूने तालुक्याला रूम केली , खोली भाळ्या ने केली शिकवणी सुरू झाली अभ्यास जोमात होत होता एक दिवस खोली चा महिना संपला आता पैसे कुठून येणार , त्याने पैसे घरी मागायचे ठरविले , ठरविल्या प्रमाणे त्याने घरी पैसे मागितले पैसे मिळाले 2,3 महिने असेच सुरू राहिले एक वेळ घरी गेला असताना घरच्यांनी विचारले अभ्यास कसा काय सुरू आहे , त्यांचे बाबा सांगत होते जागा भरपूर निघाल्या , फार्म भरला न ते मागे फार्म भरला होता त्याचे काय झाले, गणुला काहीच समजत नव्हते काय बोलावे आणि काय सांगावे , पण हो ला हो म्हणणे गरजेचे होते , सरकार इकडे जागा काढत नाही , अभ्यास पण चांगला जोमात सुरू आहे .पण असे प्रश्न असले की नकारार्थी माणसाचे मन होऊनच जाते बगा, गणू दुसऱ्या दिवशी खोली वर गेला.............. Tobe.. Continue.....




शुक्रवार, २ जुलै, २०२१

भारतीय संविधान का पहला संशोधन

भारतीय संविधान का पहला संशोधन
     पहला सविधान संशोधन 1951 मे हूवा, वह तीन प्रकार से साविधान संशोधन किया गया.
1. भारतीय अभिव्यक्ती स्वतंत्र :- भारतीय संविधान कलम 19 यह सविधान का मूल हैं जिसके कारण भारतीय नागरिक को , बोलणे की आझादी, पुरे भारत में काही पर भी घुमानेकी आझादी, कोई भी धंदा करणे की आझादि प्रदान करती हैं , लेकीन भारत स्वतंत्र होणे के बाद भारत मे कहि शरणार्ती आणे लगे जीसके कारण रोज के झगडे होते थे तब    मीडिया ने सरकार की आलोचाना की तब की सरकार ने  भाषण और अबिव्यक्ती स्वतंत्र का दुरुपयोग के नाम पे भारतीय संविधान कलम 19 (1) मे कही सुधार किये ओर 19(1)(a) के संशोधन के तहत भाषण ओर अभिव्यक्ती स्वतंत्र ता को प्रतिबंधित किया.

2. भारत के जो लोग आर्थिक ओर सामाजिक जो भी पिचडा वर्ग हैं उनके लिये उनकी उन्नती के लिये कुछ बदल किये गये 

3. भारतीय सविधान मे कलम 31 (b) को जोडा गया ,
सबसे पहले कलम 31(b) क्या है  समज लेते हैं 
     यह धारा समाज हित के लिये बहोत ही महत्त्वपूर्ण भूमिका निभाती हैं , जैसे की हम देखते हैं बडे बडे रोड, पुल ई.  बनाये जाते हैं , वह रोड किसिना किसी के जमीन पे बनते होंगे , जब कभी समाज हित के लिये या लोगो के भालाई के लिये भारत सरकार जमीन के मलिक से जमीन लेकरं वाहा पे लोगो के भलाई के लिये कार्य करती है , यह सब कुच कलम 31(b) के कारण ही संबव हो सका हैं.

4. पहले सविधान संशोधन मे 9 अनुसूची शामिल :-
     केंद्र ओर राज्य के ऐसे काणून जो की जिस कानुन को अदालत मे न्यायालय मे चूनौती नही दी जा सकती , ओर पहले सविधान संशोधन मे 31(b) शामील किया गया कलम कानून को अनुसूची 9 मे जोडा गया.  यह सब कार्य पंडित नेहरू की कार्यकाल मे हो रहे थे तब भारत का राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद थे

भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती

आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर...